🌹 *चिंचा माणविका*🌹
जसजसा भगवंतांच्या शिकवनुकीचा प्रचार वेगात होऊ लागला, लोक धम्मापासुन लाभान्वीत होऊ लागले, तसतशी बुद्धांच्या अनुयायांची संख्या वाढु लागली. त्यांची यश किर्ती वाढु लागली. मान सन्मान वाढू लागला. समाजात त्यांची प्रतिष्ठा प्रबळ होऊ लागली. मिथ्या कल्पना आणि अंधविश्वासावर आधारीत अनेक अन्य सांप्रदायवाद्यांच्या शिकवणूकीपासुन लोकांची अंधश्रद्धा तुटु लागली. परीणामी, अशा सांप्रदायीकांचा मान-सन्मान आणि लाभ-सत्कार घटू लागला. त्यामुळे हे लोक बेचैन झाले. ईर्षा आणि व्देशाने तीळ्पापड झाले. परंतु बुद्धांचे काहीच करु शकत नव्हते.
सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला.
अशा वेळी त्यांच्यापैकी कोणाला तरी एक युक्ती सुचली. काही केल्या शील आणि सदाचाराच्य क्षेत्रात बुद्धांना बदनाम केले तरच स्थिती बदलेल. आपल्या अनुकुल आणि बुद्धांना प्रतिकुल होईल. जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची एक परिव्राजिका राहाते. ती युवा आहे, तिचा देह आणी रुप आकर्षक आहे. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शकते. चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कांडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.
एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. यां सांप्रदायीकांना त्यांच्या कटकारनाम्यात मदत करण्यासाठी चिंचाने खलनायीकेची भुमीका निभावण्याचे कबुल केले.
चिंचा स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!
जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला. हळु हळू बातमी काही लोकांमध्ये पसरली.
आठ-नऊ महिन्यानंतर एक दिवस तिने एक लाकडाचा अर्धगोलाकार तुकडा आपल्या पोटावर दोराने बांधला आणी कीटकदंशानी हात सुजवुन घेतले. त्यावेळी भगवान बुद्ध, धर्मसभेमध्ये मोठ्या संखेने उपस्थित असलेल्या भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते. भगवंतांना कलंकीत करण्याचा योग्य माहोल पाहून तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणि आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही.”
धर्मसभेस उपस्थित श्रोतावर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने रंचमात्र विचलीत न होता, अतिशय शांत चित्ताने, करुणाभरीत वाणीने, गंभीर स्वरात भगवान बुद्ध म्हणाले, “हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघानाच माहीत असणे संभाव्य आहे.”
एवढे मोठे लांछाण लाऊनही भगवंत अविचल आहेत हे पाहुन चिंचा स्वत: विचलीत झाली. ती फार घाबरली, तीचा श्वास तेज झाला. अंगातुन घाम वहु लागला. तीला काही सुचत नव्हते, तरीपण चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तीसरा कोण जाणनार?” कामभोगाचा आनंद तर एकांतात घेतला जातो.”
तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले. त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले. अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात.
*जयमंगल अष्टगाथा मधील पाचवी गाथा आपल्याला चिंचा नावाच्या स्त्री बद्दल माहीती सांगते,,* या कथेत चिंचा नावाची स्त्री जैन तीर्थकांच्या सांगण्यावरुन भगवान बुद्धांवर अनैतिकतेचा आरोप करते.....
*कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे ।*
*सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।*
*_ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो._*
🌹 *सर्वांचे मंगल होवो*🌹
0 Comments